Friday, September 5

महेन्द्रसिँग धोनीस कसोटी संघाचे कर्णधारपद देणे योग्य आहे काय?

महेन्द्रसिँग धोनीच्या यशोमालिकेमुळे त्याला अनेक चाहते मिळू लागले आहेत. गॅरी कर्स्टन (भारतीय संघाचे प्रशिक्षक) यांनीही धोनी कर्णधारपदासाठी सक्षम असल्याचे विधान नुकतेच केले आहे.
आत्मविश्वास हरवलेल्या चार मातब्बर खेळाडूंचे (सचिन, द्रविड, गाँगुली व लक्षमण) याँचे सततचे अपयश हेच सध्याचा कसोटी कर्णधार अनिल कुंबळेच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. या उलट धोनीच्या यशात तरुण व जिगरबाज फलंदाजांचा (रैना, रोहित शर्मा, युवराज, बद्रीनाथ ) यांचा सिंहाचा वाटा आहे. उतरणीस लागलेल्या या दिग्गजांनी आता पाय उतार व्हायला हवे. तरच धोनी नव्या दमाच्या खेळाडूंच्या साथीने वनडे मधील यशाची पुनरावॄत्ती कसोटी मालिकेत करु शकेल.
या पोस्टच्या इंग्रजी आवॄत्तीसाठी अवश्य भेट द्या..http://indsport.blogspot.com

0 comments: