Saturday, October 4

नव्या निवड समितीत सुरेन्द्र भावे : एका गुणवान खेळाडूला उशीरा मिळालेला न्याय


गेल्या दशकात देशांतर्गत क्रिकेट मध्ये धावांचा पाऊस पाडणऱ्या महाराष्ट्राच्या सुरेन्द्र भावेचा नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या निवडसमितीत समावेश झाल्याने आनंद वाटला. जवळजवळ आठ हजार धावा व अठ्ठावीस शतके ठोकूनही त्या वेळच्या निवडसमितीने त्याच्यावर फारच अन्याय केला होता. दुय्यम दर्जाच्या सार्क कप स्पर्धेत १९९२-९३ मध्ये भारतातर्फे केवळ दोन सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. तेव्हा निवडसमितीने डावलले तरी आता त्यालाच ’सिलेक्टर’पद मिळाले हा नियतीचा वेगळाच न्याय!
भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मराठी क्रिकेटपटूंची संख्या मोठी आहे. पण त्यातील बहुसंख्य मुंबईकडून खेळणारे. महाराष्ट्र राज्यातील इतर दोन संघातील (महाराष्ट्र व नागपूर) खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर क्वचितच मिळाली. केवळ चंदू बोर्डे यांना भारतीय संघाचे कर्णधारपद, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवडसमितीचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
अत्यंत प्रतिभावान असूनही दुर्लक्षित रहाण्याची वेळ अनेक महाराष्ट्रियन क्रिकटर्सवर आली आहे. ज्या काळात मध्यमगती गोलंदाजांची वानवा होती त्या काळात पांडुरंग साळगावकरला डावलण्यात आले. १९७५ च्या आसपास महाराष्ट्राचे हेमंत कानिटकरचेतन चौहान ऐन भरात होते. पण कनिटकरला केवळ दोन सामन्यांसाठी संधी मिळाली. तर चौहानची वर्णी लागली तो बेदीच्या दिल्ली संघात गेल्यावरच. सुरेन्द्र भावेसारखाच गेल्या पंचवीस वर्षात अनेक गुणी खेळाडूंवर अन्याय झाला. राजू भालेकर, शंतनू सुगवेकर, मिलिंद गुंजाळ, इक्बाल सिद्दिकी अभिजित काळे ही अशीच काही नावे. हृषिकेष कानिटकरला मात्र मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची उपेक्षा बघून की काय, काही जणांनी दुसऱ्या संघांकडून खेळणे पसंत केले. जहीर खान (बडोदा) व संजय बांगर (रेल्वे) ही ठळक उदाहरणे. धीरज जाधवने तर वैतागाच्या भरात बंडखोरी करून आयसीएलचा रस्ता धरला. सुरेन्द्र भावेच्या निवडसमितीतील कारकीर्दीत महाराष्ट्राच्या प्रतिभेला न्याय मिळेल अशी आशा वाटते.

Wednesday, October 1

’सिलेक्टर’ श्रीकांतची सावध खेळी: भारतीय संघात सर्व जुनेच चेहरे!

कृष्णम्माचारी श्रीकांत त्याच्या धडाकेबाज व आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण निवड समितीच्या अध्यक्षाची त्याच्या कारकीर्दीची सुरुवात अतिशय सावधपणे झाली आहे. निवड समितीने कुठलाही धोका न पत्करता सर्व जुन्याजाणत्या खेळाडूंनाच ऑस्ट्रेलिया विरुध्द्च्या पहिल्या दोन सामन्यासाठी निवडले आहे.



सर्व ’सीनीयर्स’चे सामूहिक अपयश हेच श्रीलंकेविरुध्द्च्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचे मुख्य कारण. इराणी ट्रॉफी संघातून गांगुलीला वगळून निवड समितीच्या मावळत्या अध्यक्षांनी नवीन संघबांधणीचे संकेत दिले होते. अशात गांगुलीला परत संघात घेऊन नव्या निवड समितीने माघार घेतली असेच म्हणायला हवे. उलट संघातील इतर प्रस्थापित (द्रविड, सचिन, लक्षमण, कुंबळे) यांनी जर क्रिकेट मंडळाने देऊ केलेली व्हीआरएस लवकर स्वीकारली नाही तर एकेकाला सक्तीने ’रिटायर’ करण्याच्या दिशेने आता विचार करायला हवा। फटकेबाज श्रीकांतची ही सावध सुरुवात थोडीशी अनपेक्षितच.


संबंधित लिंक्स:


Sunday, September 28

खेळाडूंची स्वेच्छानिवृत्ती

नुकत्याच झालेल्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी शेष भारत संघासातून सौरव गांगुलीला वगळण्यात आले। अन्य वरिष्ठ खेळाडूंसाठीही ही जणू पूर्वसूचनाच आहे. आपले प्रदर्शन दिवसेंदिवस खालावत असताना द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण, व कुंबळे यांनीही ’ड्रॉप’ होण्याची नामुष्की यायच्या आत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे योग्य नाही का?
आपला ऎन भराचा काळ आता संपला आहे हे सहजासहजी न मान्य करण्याची प्रवृती सिनेनटनट्या, राजकारणी यांच्याप्रमाणे भारतीय खेळाडूंमध्येही पहावयास मिळते। एक सुनील गावसकर सोडल्यास कुणालाही मोह आवरता आला नाही. फक्त क्रिकेटर्सच नव्हे, तर अन्य खेळाडूंमध्येही ही वृती दिसून येते. गेली सहा वर्षे उतरती कामगिरी दाखवणारी अंजू जॉर्ज, गेल्या तीन ऒलिम्पिक्समधून हात हलवीत येत असलेली अंजली भागवत, चाळीस वर्षाचा होऊनही संघात येण्यासाठी आसुसलेला धनराज पिल्ले यांच्या बाबतीत हेच म्हणावेसे वाटते.
एवढा ग्रेट कपिलदेव, पण सर्वाधिक बळींचा विक्रम गाठण्यासाठी शेवटची दोन वर्षे संघावर भारच होता. त्याच्या ग्रेटपणाच्या दडपणामुळे ते झाकून गेले. सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही तेच होत आहे. तेंडुलकरच्या फॉर्मबद्दल होणारी कुजबूज अजून मोठी होण्याच्या आत सचिन आणि कंपनीने स्वत:हून पड्द्याआड गेलेले बरे।
संबंधित लिंक्स :

Friday, September 19

टॉप टेन : मराठी मातीतून निर्माण झालेली ’खेल रत्ने’

देशाच्या सर्वांगीण प्रगतीत महाराष्ट्राने फार मोठा हातभार लावला आहे. इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडाक्षेत्रालाही महाराष्ट्राने देशाचे नाव गाजवणारे अनेक नायक दिले. क्रीडाक्षेत्रातील हे कांही निवडक मरठी मानबिंदू:
क्रिकेटमहर्षि दि.ब.देवधर : क्रिकेट आज देशातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. अनेक मरठी क्रिकेट सुपरस्टार्स महाराष्ट्रातून निर्माण झाले. पण देवधरांना आद्य क्रिकेट सुपरस्टार म्हटल्यास वावगे ठरू नये. पंचरंगी व रणजी स्पर्धांमधून देवधरानी नेत्रदीपक कामगिरी केली. भारतचे कसोटी सामन्यात पदार्पण त्यांच्यासाठी उशीरा झाले. पण इंग्लिश क्रिकेट मध्ये डब्ल्यू.जी. ग्रेस यांच्याप्रमाणेच देवधरांचे भारतीय क्रिकेट मध्ये मानाचे स्थान आहे।

खाशाबा जाधव : नुकत्याच संपलेल्या ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने खाशाबा जाधवांचे नाव नवीन पिढीला माहीत झाले. भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक मिळवण्याचे श्रेय त्यांना जाते. १९५२ च्या हेलिसिंकी ओलिम्पिक्समध्ये त्यांनी कुस्तीत ब्रॉंझपदक पटकावले होते. यंदाच्या तीन पदकविजेत्यांना भरपूर बक्षिसे व मानसन्मान मिळाले. पण खाशाबा जाधवांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली.
प्रवीण ठिपसे : भारतात व महाराष्ट्रातही बुध्दिबळ हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. १९८० पर्यंत मॅन्युएल ऍरॉन हा भारताचा एकमेव आंतरराष्ट्रीय मास्टर होता. प्रवीण ठिपसे हा ग्रॅंडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय. त्याच्या पावलावर पाउल ठेवत दिव्येंदु बारुआ व विश्वनाथन आनंद यांनी ग्रॅंडमास्टर किताब मिळवला. आनंद आज विश्वविजेता आहे. भारताकडे बुध्दिबळातील सुपरपॉवर म्हणून पाहिले जाते. पण याची सुरुवात प्रवीण ठिपसे पासून झाली हे मराठी माणसासाठी निश्चितच अभिमानास्पद!
बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर व टेबल टेनिस मध्ये सुजय घोरपडे यांनीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन केले. भारतात हॉकीची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रातही हॉकीचे फारसे चाहते नाहीत. तरीही महाराष्ट्राच्या तुषार खांडेकरने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून चांगली कामगिरी केली.
भारतीय शूटर्स सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत. राज्यवर्धन राठोड, अभिनव बिन्द्रा इ. या नव्या पिढीच्या आधी नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्याच अशोक पंडितने अनेक वर्षे केले. इतर स्पर्धांमधून चमकणाऱ्या महाराष्ट्राच्या अंजली भागवत, दीपाली देशपांडे, सीमा शिरुर या महिला नेमबाज ऑलिम्पिक्समध्ये मात्र सातत्याने अयशस्वी होत आहेत.
भारतीय क्रिकेटला अनेक मराठी रत्ने लाभली. मुंबईस तर क्रिकेटचे माहेरघर म्हटले जाते. या मोठ्या यादीतील दोन नावांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुरा होऊच शकत नाही. सुनील गावसकरसचिन तेंडुलकर. दोघेही आपापल्या कालखंडातील जगात सर्वोत्कृष्ट मानल्या गेले आहेतच. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवाच्या जवळपास गावसकरांची कारकीर्द तर सुवर्णमहोत्सवाच्या वेळेस सचिन टॉप फॉर्मात. गावसकर खंबीर तर सचिन आक्रमक. आपपल्या काळातील भारतीय समाजाचे प्रतिबिम्ब दोघांच्याही शैलीत दिसते.
तर हा मराठी ’खेल रत्नाचा’ थोडक्यात आढावा. मराठी समाजाने खेळ संस्कृतीची जोपासना करत राहिल्यास भविष्यातही अशी अनेक रत्ने या मातीतून जन्माला येतील हे नक्की!

Tuesday, September 16

क्रिकेटव्यतिरिक्त अन्य क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडू‘ची चमकदार कामगिरी

आम्हा क्रिकेटवेड्या भारतीयांच्या नजरेतून अन्य क्रीडापटू‘ची वाखाणण्याजोगी कामगिरीही अनेकदा सुटते. गेल्या आठवड्यात दोन भारतीय महिला खेळाडूंनी आ‘तरराष्ट्रीय पातळीवर उत्तम प्रदर्शन केले, पण क्रिकेटच्या गदारोळात त्याकडे दुर्लक्षच झाले।

पहिला उल्लेख साईना नेहवालचा. नुकत्याच झालेल्या बॅडमिन्टनच्या चायनीज तैपे ओपन ग्रा‘ंप्री या अत्य‘ंत प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेचे तिने अजि‘ंक्यपद पटकावले. ऑलिम्पिक्समध्येही साईनाने उपा‘ंत्यपूर्व फेरीपर्य‘त मजल मारली होती व आपल्या झु‘जार खेळाने छाप पाडली होती. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत ती पहिल्या दहामध्ये येऊ शकेल. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स पर्य‘त साईनाचे नाव सुवर्णपदकाच्या शर्यतीत नक्की येईल।

भारताच्या कोनेरु हम्पी जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निकराच्या झु‘न्जीनांतर हार पत्करली. खरे तर या स्पर्धेत हम्पी टॉप सीडेड होती पण चीनच्या चौदा वर्षीय खेळाडूने ने तिला टायब्रेकरमध्ये हरवले. इकडे पुरुषांच्या बिल्बाओ ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमाना‘कित विश्वनाथन आन‘द चक्क शेवटच्या क्रमा‘कावर फेकल्या गेला. पुढील महिन्यात त्याची क्रामनिकविरुद्ध महत्वपूर्ण लढत होणार आहे. त्याच्या ऎन तो‘डावर आन‘दला मोठा धक्का बसला आहे।

भारतीय महिला क्रिकेट स‘घाची कर्णधार मिताली राज हिची इ‘ग्ल‘डविरुद्ध एकाकी झु‘ज हेही तसे दुर्लक्षितच राहिले. अन्य क्रीडापटूंपैकी प‘कज अडवाणीने जागतिक बिलियर्डस स्पर्धेत व सौरव घोशाल याने फ्रान्स मधील स्क्वॅश स्पर्धेत अलीकडेच उल्लेखनीय यश मिळवले. एका सौरवचा (गांगुली) अस्त होत असताना कलकत्त्यातच दुसऱ्या सौरवचा (घोशाल) उदय होणे हा योगायोगच म्हणावा लागेल।

एक‘दरीत भारतीय क्रीडाक्षेत्रात अनेक प्रतिभावान खेळाडू चमक दाखवित आहेत. त्यांना क्रीडा रसिका‘ंच्या भरघोस पाठि‘ंब्याची गरज आहे.

Friday, September 12

महेन्द्रसिँग धोनी - वन डे क्रिकेटर ऑफ़ दि ईयर

ऑगस्ट २००८ मध्ये स‘पलेल्या आयसीसी च्या वर्षात महेन्द्रसिँग धोनीला अभूतपूर्व यश मिळाले. भारतीय वन डे व टी-२० संघाच्या या वर्षभरातील चमकदार कामगिरीत कर्णधार व फलंदाज म्हणून त्याची भूमिका निर्णायक होती. भारत सरकारने नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. आणि काल जाहीर झालेला क्रिकेटचे ऑस्कर आयसीसी ऍवार्डस पैकी वन डे क्रिकेटर ऑफ़ दि ईयर चा पुरस्कार म्हणजे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
काल जाहीर झालेल्या आयसीसी ऍवार्डस विजेत्यांमध्ये एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही हे आश्चर्यच! शिवनारायण चंद्रपौलने यंदा कसोटी आणि वन डे मध्ये धावांचा पाउस पाडला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड अपेक्षितच होती. वेस्ट इंडीजसारख्या सतत हरणाऱ्या स‘घासाठी काढलेल्या त्याच्या धावांचे मोल निश्चितच मोठे आहे.
डेल स्टेनची उत्क्रूष्ट कसोटीपटू व अजेंता मे‘डीसची उत्क्रूष्ट उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारा‘साठी निवडही अपेक्षितच होती. युवराजला टी-२० प्रकारातील पुरस्कार मिळाला. कसोटी संघातली जागा गमावल्यान‘तर व स्वच्छंद वागणुकीमुळे टीका झेलत असलेल्या युवराजला तेवढाच दिलासा!
या पुरस्कारामुळे महेन्द्रसिँग धोनीची लोकप्रियता अजूनच वाढतीय. कसोटी संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवावे की नाही याबद्दल चर्चा रंगत आहेत. [वाचा...] तुम्हाला काय वाटते?

Friday, September 5

महेन्द्रसिँग धोनीस कसोटी संघाचे कर्णधारपद देणे योग्य आहे काय?

महेन्द्रसिँग धोनीच्या यशोमालिकेमुळे त्याला अनेक चाहते मिळू लागले आहेत. गॅरी कर्स्टन (भारतीय संघाचे प्रशिक्षक) यांनीही धोनी कर्णधारपदासाठी सक्षम असल्याचे विधान नुकतेच केले आहे.
आत्मविश्वास हरवलेल्या चार मातब्बर खेळाडूंचे (सचिन, द्रविड, गाँगुली व लक्षमण) याँचे सततचे अपयश हेच सध्याचा कसोटी कर्णधार अनिल कुंबळेच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. या उलट धोनीच्या यशात तरुण व जिगरबाज फलंदाजांचा (रैना, रोहित शर्मा, युवराज, बद्रीनाथ ) यांचा सिंहाचा वाटा आहे. उतरणीस लागलेल्या या दिग्गजांनी आता पाय उतार व्हायला हवे. तरच धोनी नव्या दमाच्या खेळाडूंच्या साथीने वनडे मधील यशाची पुनरावॄत्ती कसोटी मालिकेत करु शकेल.
या पोस्टच्या इंग्रजी आवॄत्तीसाठी अवश्य भेट द्या..http://indsport.blogspot.com

Wednesday, September 3

नमस्कार!

ब्लाँगिंग विश्वातील माझा प्रवेश तसा अलीकडचाच.नुकतेच स्टार माझा ने आयोजित केलेल्या मराठी ब्लाँग स्पर्धेविषयी कळ्ले, आणि क्रीडाभारती या नावाने ब्लाँग आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहुर्तावर सुरु करीत आहे.याच विषयावरील माझ्या आधीच्या नोँदी http://indsport.blogspot.com या इग्रजी ब्लाँगवर उपलब्ध आहेतच.