Sunday, September 28

खेळाडूंची स्वेच्छानिवृत्ती

नुकत्याच झालेल्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी शेष भारत संघासातून सौरव गांगुलीला वगळण्यात आले। अन्य वरिष्ठ खेळाडूंसाठीही ही जणू पूर्वसूचनाच आहे. आपले प्रदर्शन दिवसेंदिवस खालावत असताना द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण, व कुंबळे यांनीही ’ड्रॉप’ होण्याची नामुष्की यायच्या आत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे योग्य नाही का?
आपला ऎन भराचा काळ आता संपला आहे हे सहजासहजी न मान्य करण्याची प्रवृती सिनेनटनट्या, राजकारणी यांच्याप्रमाणे भारतीय खेळाडूंमध्येही पहावयास मिळते। एक सुनील गावसकर सोडल्यास कुणालाही मोह आवरता आला नाही. फक्त क्रिकेटर्सच नव्हे, तर अन्य खेळाडूंमध्येही ही वृती दिसून येते. गेली सहा वर्षे उतरती कामगिरी दाखवणारी अंजू जॉर्ज, गेल्या तीन ऒलिम्पिक्समधून हात हलवीत येत असलेली अंजली भागवत, चाळीस वर्षाचा होऊनही संघात येण्यासाठी आसुसलेला धनराज पिल्ले यांच्या बाबतीत हेच म्हणावेसे वाटते.
एवढा ग्रेट कपिलदेव, पण सर्वाधिक बळींचा विक्रम गाठण्यासाठी शेवटची दोन वर्षे संघावर भारच होता. त्याच्या ग्रेटपणाच्या दडपणामुळे ते झाकून गेले. सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही तेच होत आहे. तेंडुलकरच्या फॉर्मबद्दल होणारी कुजबूज अजून मोठी होण्याच्या आत सचिन आणि कंपनीने स्वत:हून पड्द्याआड गेलेले बरे।
संबंधित लिंक्स :

0 comments: